वालुर येथे मध्यान्ह भोजन योजनाच्या नावाने सामान्य जनतेची अर्थीक फसवणुक होत असल्याची तक्रार. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 9 सितंबर 2022

वालुर येथे मध्यान्ह भोजन योजनाच्या नावाने सामान्य जनतेची अर्थीक फसवणुक होत असल्याची तक्रार.



संपादक.अनवर पठान.दि.09/09/2022.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ यांनी नोंदित बांधकाम कामगारांना पुरक पोषण आहार मिळावे म्हणुन "मध्यान्ह भोजन योजना" चालु केली असुन वालुर ता व.सेलु जि.परभणी येथे मध्यान्ह भोजन हे नोंदित बांधकाम कामगारांना न देता ज्यांची नोंदणी नाहि त्यांना दिले जात असुन संबंधीत प्रकरण असे कि मागील अंदाजित तिन महिन्या पासुन काहि एजन्ट हे ज्यांचे बांधकाम कामाशी काहिहि संबंध नाहि अशा लोकांचे आधार कार्ड जमा करुन त्यांना मध्यान्ह भोजन देत आहे व त्यांच्याशी बेहिशोबी अर्थीक व्यवहार करुन ज़बरदस्तीने आणि पात्र नसतानाहि त्यांची नोंदणी करुन घेत असुन वालुर येथील रहिवासी असतांना त्यांना 90 दिवसाचे प्रमाणात बाहेरच्या तालुक्यातील अर्थीक व्यवहार करुन कंत्राटदार, ग्रामसेवक, नगरपालिका,तसेच महानगरपालिका यांच्याकडुन मागवले जात असुन वस्तुस्थिती या उलट आहे स्थानिक बांधकाम कामगार हे वालुर व परिसा व्यतिरिक्त दुसर्या तालुक्यात कामाला जात नसताना नवीन नोंदणीला पर तालुक्यातील प्रमाणात लावने म्हणजेच तो सर्व खोटा व्यवहार असुन शासनाची योजना मिळविण्यासाठी शासनाची फसवणुक केली जात आहे.तरि हि आपन शासनिशा करुन नोंदणी करुन घ्यावी.

तसेच सदरील निवेदन नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात येत आहे.तरिहि मे.साहेबांनी विषयाचा गांभीर्याने विचार करुन तात्काळ कार्यवाहि योग्य ती कार्यवाहि करावी अन्यथा संघटनेच्या वतिने आमरण उपोषण करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे जिल्हा कामगार अधिकारी परभणी यांना दि.09/09/2022 रोजी देण्यात आला असुन निवेदनावर युवा विचार मंच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अनवर पठान तडवी,संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पठाण करिमखान तसेच राजाराम शिरसाट आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें