आपल्या राज्यात कोरोनामुळे उत्पन्न झालेल्या परिस्थितीतून सावरण्या पूर्वीच मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत करून टाकलेले आहे. अनेक ठिकाणी पिके उध्वस्त झालेली आहेत. पुरामुळे अनेक घरे आणि झोपड्या वाहून गेलेली आहेत. छोट्या व्यापार्यांना आपले व्यवसाय चालविणे अशक्य झालेले आहे. मजुरांच्या हाताला काम नाही. रूग्णालयात पुरेसा औषध पुरवठा नसल्यामुळे गरीबांना नाईलाजास्तव खाजगी रूग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत जे त्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. पिकांच्या नासाडीचे पंचनामे कुर्म गतीने होत आहेत.
अशा परिस्थितीत जमाअते इस्लामी हिंद आणि एम.पी.जे. (Movement for peace and Justice) यांच्या वतीने आज दिनांक 14/09/2021 रोजी आपल्या सेवेत खालीलप्रमाणे मागण्या मांडत आहेत.
1. पीक नुकसानीचे पंचनामे त्वरीत गतीने पूर्ण करून शेतकर्यांना तात्काळ भरीव मदतीचे वितरण करण्यात यावे.
2. कच्चा घरांची आणि झोपड्यांची झालेल्या हानीचे सुद्धा पंचनामे करून त्यांनाही तात्काळ आर्थिक सहाय्यता प्रदान करण्यात यावी.
3. शेतकरी व छोट्या व्यापार्यांना बिनव्याजी कर्ज देऊन त्यांना पुन्हा जीवन जगण्याची संधी देण्यात यावी.
4. कोविड दरम्यान मृत्यू पावलेल्या सरकारी कर्मचार्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर प्राधान्याने शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे. दुर्दैवाने या कामाला पाहिजे तशी गती मिळालेली नाही. याची मुख्यमंत्री महोदयांनी व्यक्तीशः दखल घेऊन संबंधितांच्या पाल्यांचा तात्काळ शासकीय सेवेत समावेश करावा.
5. ग्रामीण तसेच शहरांतर्गत रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे अपघात होवून अनेक लोकांचा जीव जात आहे. याची दखल घेवून रस्ता दुरूस्तीची काम तात्काळ सुरू करण्यात यावे.
6. कोविड काळात अनाथ झालेल्या मुलांच्या कल्याणासाठी जी योजना शासनाने जाहीर केेलेली तिच्या अमलबजावणीलाही वेग प्रदान करण्यात यावा.
या वेळी जमाअते इस्लामी हिंद शाखा जिंतूर चे अध्यक्ष अहेमद सिद्दीकी, एम.पि.जे. शहराध्यक्ष मेराजोद्दीन सिद्दीकी, शेख औसाफ सर, शेख गूलज़ार अहमद, अजहरुद्दीन सिद्दिकी, अरबाज़ खान, मुख्तार खान सर, अलाउद्दीन सिद्दिकी,फैसल खान व फ़रहान सिद्दिकी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें