तेज़्ज़न्युज़24.संपादक.अनवर पठाण.
दुय्यम निबंधक कार्यालयाचा कारभार मागील काही दिवसांपासून ढेपाळला असून विविध कारणाने चर्चेत असलेल्या दुय्यम निबंधकाची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुकाध्यक्षांनी 12 मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे
याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, दुय्यम निबंधक शिंदे यांच्याकडे प्रभारी पदभार आहे. शेतकरी गेल्या अनेक वर्षापासुन शेती खरेदी व विक्री करीत होते त्यांना आय
आजपर्यंत कुठल्याच प्रकारची शेती खरेदी विक्री करताना शिल्लकच पैसे लागत नवहते. परंतु शिंदे यांनी पदभार घेतल्यापासून दलाला मार्फत दस्त नोदनी होते. या व्यतिरिक्त बँकांकडून कर्ज घेण्याकरीता लागनाच्या कागदपत्र दतालामार्फत घ्यावे लागतात तसेच कुठलीही दस्तनोंदणी व ईतर सर्व काम करण्याकरीता स्वत: शेतकरी किंवा नागरीकला कार्यालयातील कर्मचारी त्यांना व्यवस्थित बोलत नाहीत व माहितीही देत नाहीत. दलालांचा पत्ता देऊन तुमचे काम दलालांमार्फत करुन घ्या असे सागण्यात येते अशावेळी दलाल ज्या ठीकाणी पावती ५ हजार असेल त्या ठीकाणी १५ ते १६ हजार रूपये शेतक-्याकडुन घेतात. ग्रामीण भागातील शेतकरी शेती खरेदी विक्री करण्या करीता आला की दलाल त्यांना आपल्या विळख्यात घेतात. आणि दलाल त्यांना त्यांच्या कडे असलेल्या गणयंत्रामार्फत तुमच मूल्यांकन निघत आहेत. आणि आता तुम्हाला अंदाजे इतके पैसे लागतात. असे म्हणतात व नंतर तुमचा नंबर दोन दिवसात आणतो व तुमची दस्त नोंदणी करून देतो. माझे साहेबा सोबत चांगले संबध आहेत असे म्हणतात व शेतकर्यांची आर्थिक लुट करतात. शहरातील ४२ ब.ड.नुसार दस्त नोंदनी करून देणे वक्फ बोर्ड इनामी जमीन बाबत वक्फ बोर्डने दुय्यम निबंधक जिंतूर यांना लेखी स्वरूपात मनाई हुकुम स.नी.नमुद करून सुध्दा देखील त्यांनी मौजे जिंतूर जामा मस्जिद नोट स.नी.१८ मधील रजिस्ट्री क्रमांक २५९३ /२०२० दि.९/१०/२०२० रोजी बा.मु.२१ लाख ९० हजार एकढ्या रक्कनेवी खरदी खत नोंदणी केली सदर जमीन जामा मस्जीत ला ईनामी असुन त्याचा नजराना ५०% रू. १० लाख ७५ हजार यवढी रक्कन जामा मस्जीत वक्फ बोर्ड मध्ये जमा न करता परस्पर खरेदी खत करून या मध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झालेता निदर्शनास येतो प्रभारी दुय्यम निबंधक शिंदे व वरीष्ठ लिपिक लवंदे कर्मचारी गेल्या ४ ते ५ वर्षा पासुन कार्यालयात कार्यरत आहेत म्हणुन त्यांचे थेट दलालांशी असल्यामुळे ते कार्यालय बंद झाल्यावर व दुपारच्या वेळी कार्यालय बंद करूनसुध्दा वसुली करत फीरतात असा आरोपही करण्यात आला आहे म्हणून मुद्रांक विक्रेते व त्यांचे दलाल व त्यांचे ठरलेले अधिकृत दलाला मार्फतच नोंदणी करतात.या सर्व प्रकाराची चौकशी करून कार्यवाही करण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष इरशाद पाशा चांद पाशा यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें