फुलंब्री : प्रतिनिधी ( दि.१२ )
राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्याची स्वप्न पाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविले तर दुसरीकडे स्वामी विवेकानंद यांनी तरुण पिढीला चालना देत हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करीत आपले जीवन धर्म प्रसारासाठी खर्च करीत काश्मिर ते कन्याकुमारीसह विदेशभर भ्रमंती केली असल्याचे मत मुख्याध्यापक श्री साबळे सर यांनी व्यक्त केले .शिरोडी येथील शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शेख सर बोलत होते.
स्वराज्याची स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी राजमाता जिजाऊ यांनी छञपती शिवाजी महाराजांना वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी श्री. साबळे सर,दौड सर,शेख सर,शिरोडे सर,घुगे सर, घोडके सर,श्रीमती सुलाने मँडम,भोसले मँडम, वानखडे मँडम, व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री गोविंद लहाने, उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळुंके व सदस्य व शाळेतील विद्यार्थी शिक्षकांसह मोठ्या संख्येने गावातील नागरिक उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें