चारठाणा ( प्रभाकर कुर्हे ) पंढरपुर पायी वारितुन परतलेल्या आपंग शेतकर्याचे कर्ज माफीत नाव नआल्याने जिंतुर तालुक्यातील हनवतखेडा येथिल दत्तराव सखाराम शिरामे नामक 42 वर्षीय शेतकर्याला बेचैनिने ह्रद्यविकाराने म्रुत्यु पावल्याचि घटना 30 जुलै रोजि रात्री 12 वाजेच्या सुमारास घडली.
या बाबत सविस्तर व्रुत्त आसे कि जितुर तालुक्यातील हनवतखेडा येथिल रहिवाशि आसलेले आपंग शेतकरि वय 42 हे आषाढी एकादशि निमित्य पंधरा दिवस ज्ञानेश्वर माउलि पायी दिंडी सोहळ्यात गेले होते दोन दिवसा पुर्वी तेथुन परतल्यावर कर्ज माफी आल्याची माहिती लोकांच्या चर्चेत कळाल्यावर आपल्याकडेही देगाव फाटा येथिल स्टेट बँकेचे 3 लाख व चारठाणा येथिल मध्यवर्ती बँकेचे दिड लाख रु कर्ज आसल्याने माफीत आले का नाहि व चारठाणा बाजारासाठी सोमवार दि 30 जुलै रोजी ते घरन निघुन गेले परंतू बँकेत गेल्यावर आपण माफित आलो नाहित आत्ता कर्ज फेडायचे कसे या चिंतेत बेचैन झालेले दत्तराव बाजार न करताच घरी परतले आणी जेवनही न करता झोपले परंतु रात्री 11 वाजेच्या सुमारास घबराहट होत आसल्याने जितुर येथे नेत आसतांना वाटेतच त्यांचा म्रुत्यु झाला त्याच्या पाश्चात तिन मुले,बायको,आई आसा परिवार आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें