दि.२६: मानवत तालुक्यातील ताडबोरगाव येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत सेलु येथील वामनराव कदम बोर्डिकर कृषी महाविद्यालय च्या विद्यार्थिनी ताडबोरगाव येथील शेतकऱ्यांचे स्वागत व संवाद कार्यक्रमाचे आयोजन दि.२५ जुनरोजी करण्यात आले होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन ताडबोरगाव च्या सरपंच सौ.सुनीता पठाडे ह्या होत्या तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एम.जी.जोधळे सर उपस्थीत होते.यावेळी शेतकऱ्यांशी ओळख व त्यांचे स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्तविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एम.आर.कदम यांनी केले सुञसंचालन व आभार प्रदषण कृषीकन्या कु.अमृता होडे यांनी केले.यावेळी कार्यक्रमास अशोकराव पठाडे,श्रीनिवास पठाडे ,ज्ञानेश्वर जामकर,सुरेश जोशी,रामचंद्र पठाडे,रामकिशन पठाडे यांच्यासह मोठ्याप्रमाणात विद्यार्थि उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें