दिव्यांग प्रश्नी दिव्यांगाचा जिंतूर परभणी पदमोर्चा.
जिंतूर प्रतिनिधी.
जिंतूर तालुक्यातील दिव्यांग जनाच्या अनेक मागण्या शासकीय कार्यालयात प्रलंबित असल्याने दिव्यांगाना अनंत अडचणीनच्या समोरे जावे लागत आहे.प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारा विरुद्ध प्रहार अंपग क्रांती अदोलन संघटनेच्या वतीने दि ४ जून सोमवार रोजी जिंतूर तहसील कार्यालय ते परभणी जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यात पदमोर्च काढला होता.
दिव्यांगाना समाजाच्या मुख्यप्रवाहात आनन्याकरिता विविध कल्याणकारी योजना बहाल करण्यात आल्या आहेत.शासन या योजनावर बिनशर्त कोट्यवधी निधी खर्च करित आसते.मात्र या योजनाची अमलबजावनी करणारी साखळी उदासीन धोरणाचा अवलंब करित आसल्याने खरर्या लाभर्थीयापर्यात योजनाचा लाभ पोहचत नाही. याची प्रचीती दिव्यांग प्रश्नी जिंतूर तहसील ते परभणी जिल्हाधिकारी कार्यालया दरम्यान काढण्यात आलेल्या पदमोर्चोने होते.कारण जिंतूर तालुक्यातील तहसील कार्यालय,पंचायत समिती, नगर पालिका, या शासकीय कार्यालयानमध्ये दिव्यांगाचे प्रश्न मागील अनेक महिण्यापासुन प्रलंबितच राहुन दिव्यांगानच्या मागण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. दिव्यांगाच्या मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता प्रहार अंपग क्रांती अदोलन संघटनेच्या वतीने जिंतूर तहसील ते जिल्हाधिकारी कार्यालया दरम्यान पदमोर्चेहा तालुका अध्यक्ष राजेश तिपाले,मनीषा वाकळे,लिंबाजी डांगे,बालाजी घुगे,लखन पंचाळ,मारोती भिसे,जनर्दान तडस,व्यंकटेश पोपळघाट,शेख सद्दाम,व अनेक दिव्यांग महिला व पुरुष यात शामिल झाले होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें