माती आडवा पाणी जिरवा उपक्रम म्हणजे दुष्काळाशी दोन हात ------ किरण पवार.
चारठाणा ( प्रभाकर कुर्हे ) चारठाणा येथे सार्वजनिक श्रमदानातुन सि सि टी बांध तयार करुण एक फार मोठा उपक्रम राज्याच्या विविध गावाबरोबर चारठाण्यातही राबवला जातोय आणी दुष्काळाशी दोन हात करण्याचा प्रयतन चालवलाय हा कौतुकास्पद आसुन आसुन माति आडवा आणी पाणी जिरवा या उपक्रमाद्वारे चारठाणा परिसरात जल साठा वाढुन दुष्काळ मुक्त होईल आसे मत बुलढाणा आर्बन बँकेचे शाखाधीकारी किरण पवार यांनी व्यक्त केले.
चारठाणा येथे सार्वजनिक श्रमदानासाठी बुलढाणा आर्बन बंकेचे कर्मचारी उपस्थित होते या वेळी बोलतांना वरिल मत शाखाधिकारी किरण पवार यांनी व्यक्त केले या वेळी नानासाहेब राउत,जि प सदस्य मिनाताई राउत,सरपंच बि जी चव्हाण,बँकेचे कर्मचारी आंकुश राहटे,विठ्ठल राठोड ,राजु इंगळे,विनोद शहाणे,प्रभाकर कुर्हे यांच्या सह देविदासराव देशमुख,रमेश राउत,दिपक भाग्यवंत,किसनप्रसाद खाडे आदींसह नागरिक उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें