गोगलगावात कडब्याच्या गंजीला आग तीन हजार कडब्यांच्या पेढ़या जलून खाक.
समशेर खान.सेलू प्रतिनिधि
मानवत तालुक्यातील गोगलगाव येथील एका शेतकऱ्याच्या कडब्याच्या गंजीला सोमवार 21 मे रोजी दुपारी 05:45 वाजता आग लागल्यामुळे सुमारे तीन हजार कडब्याच्या पेंढ्या जळून 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे याबाबतची माहिती याप्रमाणे गोगलगाव येथील रहिवाशी अंकुशराव काशिनाथराव मगर यांच्या शेतामधील कडब्याच्या गंजीला आग लागून जवळपास तीन हजार कडब्याच्या पेंढ्या जळून खाक झाल्या वीज वितरण कंपनीने लवकर वीजपुरवठा सुरू केल्यामुळे ग्रामस्थांच्या मदतीने कडब्याच्या गंजी वर पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला यामुळे शेजारी असलेल्या चार ते पाच वळाया आगीपासून ग्रामस्थांनी वाचवल्या कडब्याच्या गंजीला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करत असताना मानवत येथील अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाल्यामुळे कडब्याच्या गंजीला लागलेली आग लवकर आटोक्यात आली लागलेल्या आगीत सुमारे चाळीस हजाराचे नुकसान झाले आग वेळीच आटोक्यात आल्याने सुदैवाने शेताजवळ असलेल्या आखाड्याला याची झळ पोहोचली नाही या या परिसरात घरांसाठी वापरण्यात येणारे सर पण ठेवलेले होते व बाजूलाच दलित वस्ती होती आग वेळीच आटोक्यात आल्यामुळे पुढील अनर्थ टाळला मात्र या आगीत अंकुश मगर यांचा कडबा जळून नुकसान झाले आहे सायंकाळपर्यंत घटना स्थल पर्यंत महसूल प्रशासनाच्या सम्बधित्तनी भेट दिली नसल्याचे तेथील रहवाशिंचे बोलने आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें