पालम शहरात चक्री वादळात नुकसान झालेल्या नागरिकांना पंचनामे करून नुकसान भरपाई द्या=अनीस खुरेशी पत्रकार.
परभणी (प्रतिनिधी )
पालम शहरात मागील दोन दिवसाखाली अचानक भयंकर वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावून लाखो रूपयांचे नुकसान झाले होते शहरात चक्री वादळ व गारांचा पावसामुळे लोकांचे संसार उघड्यावर आले आहे रात्री एक वाजता अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामूळे शहरातील नागरीकांच्या घरावरील पत्रासह संसार उपयोगी साहित्य हवेत उडुन गेली तर काही ठिकाणी अन्नाची नसाडी झालेली होती
महावितरणचे विजेचे खांब तुटून लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे.अवध्या काहि मिनिटात वादळामुळे मोठ मोठाले झाडे उन्मळून नागरीकांच्या घरावर व दुकानावर पडल्यामुळे नागरीकांच्या नुकसानीत अधीक भ्रर पडली आहे.
पालम तहसील प्रशासनाने पंचनामे करून नागरिकांना नैसर्गिक आपत्ती मधुन नुकसान भरपाई देण्यासाठी कसलीच आलचाल केलेली नाहि व तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांनी सुधा पुर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे शहरातील नागरिकांच्या मनात प्रशासना विरोधात असंतोष निर्माण झाला आहे
पालम शहरात पंचनामे तातडीने करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी अनीस खुरेशी यांनी केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें