जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे औरंगबाद येथे एकदिवसीय उपाेषन संपन्न ;
सिल्लाेड दि. 9सिल्लोड (प्रतिनिधी) शेख कलिम
सामाजिक समता,बंधुत्व आणी शांतता टिकुन रहावी यासाठी औरंगबाद जिल्हा काँग्रेस कमीटीतर्फे साेमवारी(९)औरंगाबाद येथे एक दिवसिय उपाेषन संपन्न झाले.
देशपातळीवर व राज्य पातळीवर भाजप सरकारने चुकीचे निर्णय घेउन सामाजीक सलाेखा नष्ट करण्याचे कट कारस्थान रचुन शांतता भंग करण्याचे काम सुरु केले आहे.यातुन समाजात तेढ निर्माण हाेत आहे.याच प्रकारातुन देशात व राज्यात घडलेल्या दुर्दैवी घटनात अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत.
दाेन एप्रील राेजी भारत बंद आयाेजनात बिहार व उत्तरप्रदेशात झालेल्या दंगलीमागे केंद्रीय मंत्री आश्वीनकुमार चाैबे यांच्या मुलावर गुन्हा दाखल झालेला आहे.भिमा काेरेगाव दंगलीत मराठा व दलित समाजात जानीवपूर्वक संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला.यात भाजपाच्या जवळीक असलेले मिंलीद एकबाेटे व मनाेहर भिडे यांचा सहभाग स्पष्ट असतांना भाजप त्यांना वाचविन्याचा प्रयत्न करत आहे.
संघर्ष निर्माण करणे ही भाजपाची रणनिती असून शांततेला धाेका पाेहचविन्याचा हा उद्योग सुरु आहे. पसरविन्यात येत असलेला विषारी जातीयवाद धाेरनाविराेधात व पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या विराेधात जिल्हा काँग्रेस कमीटीतर्फे साेमवारी सकाळी दहा वाजता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन एक दिवसिय उपाेषनास सुरुवात करण्यात आली.
उपोषणास जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार, आ. सुभाष झांबड, कार्याध्यक्ष माजी आ. कल्याणराव काळे, माजी आ. नामदेवराव पवार, माजी जिल्हा अध्यक्ष केशवराव औताडे, सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे ,
नगराध्यक्ष अब्दुल समीर,श्रीराम महाजन,देविदास लोखंडे, कृषी उत्पन्न बाजार समीती सभापती रामदास पाटील पालोदकर,उपसभापती नंदकिशोर सहारे,दुर्गाबाई पवार,शकुंतलाबाई बन्सोड, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे,विठ्ठलराव सपकाळ,संजय मुरकुटे,मनोहर आरके,अमित आरके, राजेश्वर आरके फईम पठाण,
किरण डोनगावकर,पवन डोंगरे,बाबा तायडे,जीतेन्द्र दहाड़े,पानखड़े ताई, सरोजताई मस्लगे,रामुकाका शेळके,संदीप बोरसे,धनराज बेडवाल, बाबासाहेब मोहिते,प्रशांत सदाफल,अतिश पितळे,इब्राहीम पठान,अनील श्रीखंडे, भारत राजपूत,राहुल सावंत,आदिंसह पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें