बिहार,मध्य प्रदेशमध्ये पुन्हा तणाव; आरक्षणविरोधी बंदमुळे वातावरण पेटले.
![]() |
| संग्रहित |
आरा मध्ये पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केल्याचंही वृत्त पुढे येत आहे. आरा भागामध्ये आंदोलकांनी पोलिसांवर गोळीबार तसंच दगडफेक केली आहे ज्यात सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.बिहारच्या अनेक जिल्ह्यांमध्ये या आंदोलनाचे लोण पेटले असून आंदोलकांनी आराव्यतिरिक्त बेगुसराय आणि पाटण्यातही जाळपोळ केल्याचं समजतंय. आंदोलक हे आरक्षण हटाओ, देश बचाओच्या घोषणा देत असून त्यांना आवरणं पोलिसांना अवघड बनलं आहे. कैमूर मधील राष्ट्रीय महामार्ग आंदोलकांनी जाम केला असून इथे भयंकर वाहतूक कोंडी झाली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें