धार्मिक स्थळांसारखे, धार्मिक मंदिरासारखे ज्ञानमंदिरे जपणे काळाची गरज- मधुकर वालतुरे यांचे प्रतिपादन
आजय बोराडे.आमठाणा-प्रतिनिधी-सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथील प्रज्ञा जागृती प्राथमिक शाळेत नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन व बालोउत्सव घेण्यात आला यावेळी बोलताना जि, प सदस्य,मधुकर वालतुरे यांनी मनोगतात सांगितले की शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात ही चांगले ज्ञानदान देणारे ज्ञानमंदिरे उभारले जात आहेत जपवणूक करणे, सांभाळ करणे, हे पालक शिक्षक, व विध्यार्थी यांचे कर्तव्य आहे तसेच पूर्वीच्या काळी ग्रामीण भागामध्ये आजच्या सारखे दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळा संस्था अस्तित्वात नव्हत्या त्या सोई आता उपलब्ध झाल्याने त्याचा लाभ ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांनी घ्यायला पाहिजे असे प्रतिपादन मधुकर वालतुरे यांनी आम ठाण येथे प्रज्ञा जागृती शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात केले
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संजय बनसोड हे होते सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून,या वेळेस मान्यवरांचा पारंपरिक पद्धतीने म्हणजे शाल, श्रीफळ, नारळ याला फाटा देत प्रत्येक मान्यवरला रोपे भेट देऊन नवीन पध्दीने सत्कार करण्यात आला यानंतर विध्यार्थ्यांनी विविध प्रकारचे जसे की देशभक्तीपर गीते, लावणी, मला आमदार व्हयचे,कोळी गीत, नाटिका, नृत्य,शिवरायाचा जिवंत देखावा, विरपुत्राची यशोगाथा, बंजारा गीताचे सादरीकरण करून उपस्थितीता चे मने जिंकली
यावेळी माजी जि प, सदस्य दिलीपराव दानेकर, सावळे, संस्थेचे सचिव अशोक गरुड, उपसरपंच, भागवत मोरे, रघुनाथ मोरे, अंबादास चौधरी, डॉ संजय राहुल सपकाळ जामकर, सोनाप्पा पारखे, रंगनाथ कदम, पोलीस पाटील शरद वाघ, राजू सुसर, रामेश्वर गवते, माधवराव गवते, प्रभाकर वाघ, लक्ष्मण ठोबर,दत्तू ठोबरे,रराजेंद्र सिरसाट, मनोज दानेकर, पंढरीनाथ सोमसे, दिलीप मोरे, ज्ञानेश्वर मोरे, भारत मोरे काशिनाथ सोमसे, तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्यध्यपक,कुशल देशमुख, , सतीश घुले, विठ्ठल पुरी, कैलास रिंढे, ज्ञानेश्वर गवते, सुजित राठोड, सुरेश कुरकुटे,समाधान वाघमोडे, सुलोचना राठोड, वैशाली ब्राह्मणे, गजानन पिसे, तसेच सूत्रसंचालन अनिल देशमुख व ईश्वर शेळके यांनी केले तर आभार रामेश्वर गरुड यांनी मानले यावेळी सर्व पालक,व वाहन चालक याची उपस्थिती होती

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें