अधिकारी व पदअधिकारी बद्दले परंतु पाट्या कधि बदलनार?वालुर ग्रामपंचायतचा अजब प्रकार
+महात्मा गांधि नरेगा योजनेचा वालुर येथे उडाला बोजवारा.
अनवर पठान.
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम (महात्मा गांधी नरेगा योजना) हा अधिनियम 25 अॉगस्ट,2005 रोजी अंमलात आलेला असुन ग्रामीण भागातील कोणत्याहि घरातील काम करु इच्छीणार्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीस नरेगा अंतर्गत प्रत्येक आर्थीक वर्षात किमान शंभर दिवस सामाजिक कार्याशी संबधित असणार्या ठिकानी शारिरीक कष्टाचे काम ठराविक किमान रोजंदारीवर देण्याची हमी हा अधिनियम देतो.या योजनेची ग्रामपंचायत कार्यालयातील सुचना फलकावर ह्यासंबधिची जाहिर नोटिस लावली जाते या द्वारे रोजगार मिळालेल्याची नावे,रोजगाराचे ठिकान,वेळ,पुर्ण झालेली कामे व चालु कामे,तसेच ग्रामसेवकाचे नाव विद्यमान सरपंचाचे नाव,ग्रामरोजगार सेवकाचे नाव इतयादि या माहिती दर्शणी फलकावर दर्शवलेले असणे अवश्यक असते परंतु सेलु तालुक्यातील सर्वात मोठे गाव आसलेल्या वालुर वालुर गावात महात्मा गांधी नरेगा योजनेचे माहिती दर्शनी फलक 2013 पासुन बद्दलेलाच नसुन या ठिकानी अधिकारी व पदअधिकारी बदलुन दोन वर्षाहुन हि जास्त काळ झालेला असताना ग्रामपंचायत वालुरने या योजनेचे माहिती दर्शनी फलक बदललेच नाहि. महात्मा गांधी नरेगा योजनेची. कामे किती चालु आहेत व पुर्ण झालेल्या कामाची,कामा वरील खर्च,प्रगतीपथावरील कामे व या दर्शणी फलकावरील सर्वच माहिती हि इस.सन.2013-14 ची आहे.व यामुळे लोकांची एकप्रकारे दिशाभुल होत आहे.
या योजनेच्या प्रचार व प्रसारासाठि शासन लाखो रुपये खर्चा करत असताना वालुर येथील ग्रामपंचायचे या संबधिचे माहिती दर्शनी फलक चूकिच्या पध्दतीने लावने म्हणजेच ग्रामपंचायत किती अकार्याक्षम आहे यावरुनच समजते.ग्रामपंचायत वालुर मनरेगाचे दर्शणी फलक कधी बदलनार व लोकांची होनारी गैरसोय कधि थांबनार आशी चर्चा सुरु आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें