अजिंठा/प्रतिनिधी
काही बदल घडवायचे असल्यास प्रथम सुरुवात आपल्या पासून करावी तसेच विद्यार्थानी सादर केलेले 'स्मार्ट सिटी' प्रयोगपासून ग्रामस्थांनी बोध घेऊण जगप्रसिद्ध अजिंठयात 'स्वच्छ भारत' अभियान राबवावे असे अवाहन फौजदार अर्जुन चौधर यांनी केले.अजिंठा येथील हमदर्द चॉरिटेबल संस्थेचे नॅशनल इंग्लीश स्कृल मध्ये शनिवारी (दि.६) विद्यार्थानी बनविलेले विज्ञान प्रयोग प्रदर्शित करण्यात आले होते.या क्रार्यक्रमाचे उदघाटन सरपंच दुर्गाबाई पवार,उपसरपंच शेख लुकमान,फौजदार अर्जुन चौधर,संस्थाध्यक्ष प्रा.ऐकबाल अहेमद,तंटामुक्ती अध्यक्ष शेख मन्नान यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी अली बीनमाझी,माजी सरपंच सय्यद नासेर,माजी उपसरपंच दिलीप झलवार,डाॅ. भाऊसाहेब सोळके,अजय गुप्ता,राजेश ढाकरे,राजू सेठ,मुजीबखाँ पठाण,राधेशाम कुलवाल,डॉ.आसिम आदीची उपस्थिती होती.विद्यार्थानी स्मार्ट सिटी,वायरलेस इंन्रजी,टेबल फॅन,स्वच्छ शाळा,प्रदुषणचे दुषःपरिणाम आदी विज्ञान प्रयोग सादर केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव जियाऊल हक,संचालक शम्सऊल हक,शेख मोईन,मुख्याध्यापक जहिर अन्सारी,मोहमंद रफी,शेख युनुस,शे.मुसद्दीन,अतुल गुप्ता,माजीत पठाण,साबळे,शरिक,खुस्सो आदी शिक्षकवृंदानी परिश्रम घेतले.
'स्मार्ट सिटी'प्रयोग जिल्हास्तरावर..
नॅशनल इग्लीश हायस्कृल च्या विद्यार्थानी सादर केलेले स्मार्ट सिटी प्रयोगाने सिल्लोड तालुक्यात प्रथम क्रंमाक पटकिवले तर औरंगाबाद येथे नुकतेच सपन्न झालेले जिल्हास्तरीय प्रर्दशना प्रर्यतं पोहचल्याने सरपंच दुर्गाबाई पवार,फौजदार अर्जुन चौधर,प्रा.ऐकबाल अहेमद,उपसरपंच शेख लुकमान यांनी विद्यार्थासह शिक्षकांचा सत्कार केला.
छायाचित्रात:
येथील नॅशनल इग्लीश हायस्कृल मध्ये प्रर्दशन करण्यात आलेल्या विज्ञान प्रयोग पाहताना प्रतिष्ठीत दिसत आहे.
छाया:असलम पठाणअजिंठा)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें