- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 17 दिसंबर 2017

मानवत येथील अनीस बेलदार यांच्या कुटुंबीयांची ४९८ तून निर्दोष मुक्तता!

मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१७: मुंबई येथे घर घेण्यासाठी माहेराहून दहा लाख रुपये घेऊन ये म्हणून मला छळ करण्यात आली अशी तक्रार अनीस बेलदार यांची पत्नी शेख नाजमीन बेगम खाजा बेलदार रा.सेलू यांनी मानवत येथील अनीस बेलदार व त्यांच्या कुटुंबीयातील ८ जणांविरुद्ध दिनांक २७ जून २०११ रोजी मानवत पोलीस स्टेशन येथे या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.दोन्ही पक्षांचे म्हणने,पूरावे,साक्षीदार व दोन्ही पक्षांच्या वकीलांचे यूक्तीवाद ऐकून आरोपींवर असलेले कोणतेही आरोप सिद्ध न झाल्यामुळे न्यायाधीश श्री. जे .जी .वाघ. दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर मानवत यानीं दिनांक १३ डिसेंबर रोजी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की,मुंबई येथे घर घेण्यासाठी माहेराहून दहा लाख रुपये घेऊन ये म्हणून मला छळ करण्यात आली अशी तक्रार अनीस बेलदार यांची पत्नी शेख नाजमीन बेगम खाजा बेलदार रा.सेलू यांनी त्याचे पती अनीस बेलदार व त्यांच्या कुटुंबीयातील सासु,सासरे,ननंद असे ८ जणांविरुद्ध दिनांक २७ जून २०११ रोजी मानवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता.
अनीस बेलदार वय  ३६ वर्ष. रा.मानवत हे मुंबई  येथे शिक्षक आहेत. त्याचां विवाह सेलू येथील शेख नाजमीन बेगम खाजा बेलदार यांच्याशी १२ फेब्रुवारी २००९ रोजी संपन्न झाला होता.
मानवत पोलीस स्टेशनला आय.पी.सी. ४९८ अ, ३२३, ५०४, ५०६ नूसार गून्हा नोंदविण्यात आल्यावर पुढील तपास करुन केस क्रमांक. ७१/२०११ दिनांक ०२/०८/२०११ रोजी दिवाणी न्यायालयात कनिष्ठ स्तर मानवत येथे चार्जशिट दाखल करण्यात आली होती.
दोन्ही पक्षांचे म्हणने,पूरावे,साक्षीदार व दोन्ही पक्षांच्या वकीलांचे यूक्तीवाद ऐकून आरोपींवर असलेले कोणतेही आरोप सिद्ध न झाल्यामुळे न्यायाधीश श्री. जे जी वाघ, दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर मानवत यानीं दिनांक १३/१२/२०१७ रोजी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
फिर्यादी तर्फे सरकारी वकील श्री. आर.आर. जोंधळे तर आरोपींपक्षातर्फे श्री.ए .जे .काळदाते व श्री. वि. जे .काळदाते यानीं काम पाहिले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें