प्रतिनिधी.दि.15/09/2020.
भारत आणि चीन यांच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इमाम ए जुमा आणि शिया धर्मगुरु मौलाना कल्बे जवाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे कि, चीनने जे भारतीय सैन्यासोबत अमानुष वर्तवणूक केली त्याचं उत्तर भारतीय जवानांनी चीनला सडेतोड दिलं, यापुढेही जवान चीनला उत्तर देण्यास सक्षम आहेत. ज्यारितीनं कारगिल युद्धात शिया मुसलमानांनी भारतीय लष्काराला पूर्णपणे सहकार्य केले तसेच आता पण चीनसोबत युद्ध झाल्यास देशातील शिया मुसलमान एकत्र देशासोबत उभे राहू. देशाच्या रक्षणासाठी शिया मुसलमान जीवाची बाजी लावण्यासही तयार आहेत असं त्यांनी पंतप्रधानांना सांगितले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें