संपादक.अनवर पठान दि.29/05/2020.
वालुर ता.सेलु जि.परभणी रहिवासी शे.अल्लाऊद्दिन शे.अफल्लोद्दिन यांनी दि.27/05/2020 रोजी महाफुड आँनलाईन पोर्टलवर संबंधित राशनदुकादार उध्दव दौलतराव चौव्हान दु.नं.5 हे त्यांना राशन देत नसुन संबंधित तक्रारदार यांची शिधापत्रीका 2017 मध्ये निर्गमित करण्यात आलेली असुन त्यांना आजपर्यंत स्वस्त धान्याचा लाभ मिळालेला नाहि व दुकानदाराने त्यांना RC.Number हि दिलेला नाहि.आजच्या घडिला मला धान्याची खुप गरज असून मला न्याय द्यावा.या अशयाची तक्रार संबधीत तक्रार दाराने केलेली असुन संबधीत राशन दुकानदारावर योग्य ती कार्यवाहि करुन न्याय देण्याती मागणी केली आहे.
या अपदाच्या काळात कोरोनाने हाहाकार केलेला असताना गरिबाच्या हताला काम नाहि व केंद्र शासनाने गरिबी कल्यान योजनेची घोषणा करुन प्रत्येक गरजुना अन्नधान्य देन्याचे जाहिर केले परंतु परभणी जिल्ह्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर असुन पुरवठा विभातील खुद अधिकारी भ्रष्टाचार करीत असलेल्या स्वस्थ धान्य दुकांदारास पाठीशी घालत असुन कसलीच कार्यवाही करीत नसल्यामुळेेच गरीबांवर उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे. ज़र राशन दुकानदार राशन ऑनलाईन होऊन हि ज़र शासनाच्या डोळ्यात धुळ टाकुन गरीब जनतेचा राशनचा माल खात असेल तर शासनाच्या योजनात किती भ्रष्टाचार चालु आहे उघड्या डोळ्याने दिसत आहे यांचे जे तक्रारी करतो त्यांना तर न्याय मिळेल परंतु सामान्य गरीब निरक्षर जनतेचा काय हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें