विद्यार्थ्यांमध्ये इच्छाशक्ती निर्माण करा- डाँ. अमोल देशमुख=341 विद्यार्थ्यांनी दिली स्पाँट एक्झाम. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 3 मार्च 2019

विद्यार्थ्यांमध्ये इच्छाशक्ती निर्माण करा- डाँ. अमोल देशमुख=341 विद्यार्थ्यांनी दिली स्पाँट एक्झाम.

सेलू प्रतिनिधी

सेलू:- येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रिन्स अकँडमी आयोजित यशस्वी पालकत्व आणि शिक्षणाप्रती मुलाच्या मनातील इच्छा निर्मिती मागचे मानसशास्त्र या विषयावर आधारित पालकासाठी जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम  (ता.३) मार्च वार रविवार रोजी विद्याविहार शैक्षणिक संकुलानाला पार पडला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय रोडगे, प्रसिद्ध बाल मानस शास्त्रज्ञ तथा मुख्य व्याख्याते डॉ. अमोल देशमुख, संस्थेच्या सचिव डाँ.सविता रोडगे, डाँ.अपुर्वा रोडगे तसेच प्रशासकीय अधिकारी, सर्व घटक संस्थेचे प्राचार्य आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
आजच्या स्पर्धेच्या व धकाधकीच्या जीवनात आपला मुलगा व मुलगी यशस्वी व्हावा असे प्रत्येक पालकाला वाटत असते. परंतु त्यासाठी आवशकता असते ती योग्य मार्गदर्शनची. पालकांनी विद्यार्थ्याना समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. पालकाच्या वागण्यातून पाल्या प्रति वागण्या बोलण्यातून सकारात्मक भाव निर्माण झाला पाहिजे. कोणताही प्रसंग असो विद्यार्थ्याला मत असणे अत्यंत आवश्यक आहे.
          परीक्षेतले गुण, खेळातील किंवा कुठल्याही बाबतीतील यश-अपयश ह्या पेक्षा पाल्याच्या शंभर टक्के प्रयत्न करण्यातला आनंद, प्रक्रियेतला आनंद महत्वाचा आहे. पालकांनी प्रत्येकवेळी पूर्ण झोकून देऊन प्रयत्न विद्यार्थ्याप्रति करायला हवेत. त्याचं फळ बहुतेक वेळा चांगलंच मिळेल. चुकून अपयश आलंच तर विद्यार्थ्यानी दुख:करीत बसण्यापेक्षा आत्मपरीक्षण केले पाहिजे. व निराश न होता पुन्हा सकारात्मक प्रयत्न केले पाहिजे.. ते आपल्या विचारसरणीचा भाग बनले पाहिजे. प्रत्येक क्षण चांगल्या पद्धतीने आनंदाने व्यतीत करण्याची, उपभोगण्याची कौशल्ये पालकांना मिळवता येतील. पालकांनी स्वत: आनंदी रहाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पालकाच्या संपर्कात येणाऱ्या पाल्य व समाजास आनंद देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण समाजाचा भाग आहे आणि त्याच्याप्रती पालकाची काही कर्तव्ये आहेत..
विकसित व्यक्तिमत्वाची मुले आयुष्यात काय करू शकतात. आयुष्यातल्या कुठल्याही प्रसंगाला सकारात्मक पद्धतीने सामोरे जाऊ शकतात. कठीण प्रसंगात न डगमगता योग्य निर्णय घेऊ शकतात. यश डोक्यात जाऊ देत नाहीत वा अपयश आल्यास खचून जात नाहीत. नवीन कौशल्ये खूप लवकर आत्मसात करतात. संवादकौशल्ये, आत्मविश्वास व सकारात्मकतेने छाप पाडू शकतात. आपल्या क्षमता शंभर टक्के वापरण्याचा प्रयत्न करणे व त्या प्रक्रियेचा आनंद घेणे त्यांना जमू शकते. केवळ स्वत:पुरता विचार न करता इतर व्यक्तींच्या दृष्टीकोनातून विचार करू शकतात. स्वत: च्या विकासाबरोबरच कुटुंब, समाज ह्यांच्या सृजनाचे भान त्यांना असते.
सगळ्या आवश्यक संकल्पना मनात रुजवण्यासाठी पालक, आईवडिलांनीही प्रयत्न करायला हवेत. आपलं मूल भावनात्मक दृष्ट्या सक्षम करण्यात त्यांचे स्वत:चे वर्तन आणि मुलांच्या विकासाला पाठींबा ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. मुलं नैसर्गिकपणे आईवडिलांच्या वागण्यातील गुणावगुण टिपत असतात. मुलांमधील कुठलाही दोष, वैगुण्य, कमतरता ह्याकडे दुर्लक्ष्य करू नये. मोठा झाला की आपोआप सगळं ठीक होईल ह्या गैरसमजात राहू नये. करियर संबंधातील आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा आकांक्षा, मुलांवर त्यांची इच्छा नसताना लादू नयेत. त्याने मुलांच्यावर दडपण येईल जे विकासाला मारक ठरेल. मुलांची नैसर्गिक क्षमता व इच्छा जे करण्याची असेल त्याला प्रोत्साहन द्यावे. आपल्या पाल्याची इतर मुलामुलींबरोबर तुलना करीत राहणे टाळावे. प्रत्येक मूल वेगवेगळ्या नैसर्गिक क्षमतेचे असते.
समृद्ध व्यक्तीमत्वाचे सहा सोपान नेहमी लक्षात ठेवायला हवेत. उत्तम शारीरिक तब्ब्येत, उत्तम मानसिक आरोग्य, नात्यातील व ओळखीच्या व्यक्तींशी तसेच स्वत:शी छान नाते, निसर्गातील प्रत्येक सजीव, निर्जीव, पशु पक्षी वगैरे सर्वांशीच छान नाते, आवश्यक तितका पैसा व भौतिक सुखसोयी ( लालसाविरहित), प्रत्येक क्षणी आनंदी राहण्याची कला आणि कुठल्याही परिस्थितीत असलो तरी समाधानी मन:स्थिती ह्या गोष्टी जीच्याजवळ आहेत ती व्यक्ती समृद्ध मानायला हवी. आजच्या मुलांचा व्यक्तिमत्व विकास हा भौतिक यशाबरोबरच, मूल्य शिक्षण व आंतरिक स्वस्थता ह्या दोन्ही उद्दिष्टांच्या दिशेने हवा.असे डाँ.देशमुख आपल्या व्याख्यानात म्हणाले.

स्पाँट एक्झाम या परिक्षेसाठी प्रिन्स ञअकँडमी या केन्द्रावर एकुन 341 विद्यार्थ्यांनी दिली परिक्षा. ही परिक्षा विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर आधारित घेण्यात आली. यामध्ये गणित, इंग्रजी व बुद्दीमत्ता या विषयावर होती. यामध्ये प्रत्येक वर्गातुन प्रथम येणार्या विद्यार्थ्यास 75% स्काँलरशीप, द्वितीय 50% तिसर्यास 25% शैक्षणिक फीस मध्ये सवलत तसेच याव्यतिरीक्त 501/- व द्वितीय 301/- असे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
कारक्रमाचे सुत्रसंचलन संजय ठाकर तर आभार प्रदर्शन ग्लँन्सी फर्नानडीस यांनी मानले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें