मानवत / मुस्तखीम बेलदार.
दि.०६: मानवत तालुक्यातील रुढि पाटि येथे दुष्काळाची पाहणी करण्यासाठि आलेले केन्द्र पथक यांना व
मा.विभागीय आयुक्त यांना पाथरी विधानसभाचे आमदार मोहन फड यांच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन दि.६ डिसेबर रोजी देण्यात आले
दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे पाथरी मतदार संघातील सभाव्य चारा टंचाई ची तिव्रता कमी करण्यासाठि वैरण बियाणे व खते वितरीत करण्यासाठि शासन स्तरावरुन कृती आराखडा तयार करण्यात यावा,पिण्याच्या पाणीची टंचाई ची तिव्रता कमी करण्यासाठि कृती आवश्यक तयार करुन जनतेला पिण्याच्या पाण्याची उणीव भास्नार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात,पडलेल्या दुष्काळामुळे खरिपाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच रब्बीची पेरणी अत्यंत कमी प्रमाणात झालेली आहे खरीप पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आसल्यामुळे पाथरी मतदार संघातील शेतकऱ्यांना आर्थीक मदत देण्याबाबत शासन स्तरावरुन निर्णय घेण्यात यावा व मजुराचे स्थालतर थाबविण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे तात्काळ सुरु करावी तसेच दुष्काळाची तिव्रता कमी करण्यासाठि सर्व उपाययोजना करण्या बाबत निर्देश देण्यात यावेत अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें