औरंगाबाद (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडीया मराठवाडा विभागा तर्फे मुंबई येथे झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यातील विरमरण आलेल्या शुरवीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. औरंगाबाद येथील हुसेन कॉलनी येथे सायंकाळी सात वाजता सोशल मीडीया मराठवाडा चिटणीस जावेद खान यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या ठिकाणी २६/११ तील शुरविरांचे स्मरण करुन मेनबत्ती मार्च काढण्यात आला मेनबत्त्या पेटवुन शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली पूर्व विधानसभा शहराध्यक्ष राजेश पवार यांनी त्यांच्या शौर्या बद्दल माहिती दिली यावेळी उपस्थित ओबीसी जिल्हाध्यक्ष विलास ढंगारे, उपाध्यक्ष अलीम पटेल, शेख आमेर, सलमान पटेल, लुकमान पटेल, आफताब खान,मुजीब खाॅन,रतन पाखरे,नदीम पटेल, खालेद खाॅन, इस्माइल शेख, अजहर पठाण, अफरोज शेख, अजय शेलार, परवेज खाॅन, आवेज खाॅन, फारेस खाॅन, शहेबाज शेख,अजीम पठाण,गणेश भालेराव, सिद्दीक शेख
आणि परिसरातील नागरिक उपस्थिति होते या आदरांजली कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांचे सोशल मीडीया शहर जिल्हाध्यक्ष विलास मगरे यांनी आभार मानले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें