अनवर पठान.दि.28/09/2018.
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यात सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतर ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट केली गेलेली नाहीत अथवा प्रारुप मतदार यादीमध्ये करण्यात आलेल्या नोंदीबाबत आक्षेप घ्यावयाचे असतील किंवा त्यामध्ये दुरुस्ती / सुधारणा करावयाच्या असल्यास अशा मतदारांनी विहित नमुन्यामध्ये अर्ज करायचा आहे.परंतु आशे बरेशचे नविन मतदार आहेत जे ज्यांचे नाव मतदार यादित नाहि.सेलु तालुक्यातील वालुर येथील जि.प.शाळेतील काहि शिक्षकांना याची कामे दिलेली आहे.या ठिकानी एक आडचण येत आहे कि आम्हि स्वतः नविन मतदारांचे परिपुर्ण अर्ज़ भरुन दिलेले असुन सेलु येथील तालुका निवडणुक आधिकारी यांनी त्यांना आदेश दिलेले आहे कि निवडणुकित नविन नाव समानिष्ठ करण्यासाठि "शाळा सोळल्याचे"प्रमाणपत्र बंधनकारक आहे,ज्यांनी शाळा सोळल्याचे प्रमाणपत्र अर्जा सोबत दिलेले नाहि त्यांची नाव नोंदनी होनार नाहित यामुळे बहुतेक नागरीक हे मतदान नोंदनी पासुन बंचित राहत आहे.
"रहिवासी"साठि पुरावे पुढिल प्रमाणे असतात.भारतीय पारपोर्ट,ड्राईविंग लाईसेंस,बँक पासबुक,राशन कार्ड,नळ/घरपट्टि,टेलिफोन बिल,गँस कनेक्शन बिल इ.पैकि एक.
"वयाचा पुरावा/ओळखपत्र पुरावा"जम्म प्रमाणपत्र,10वी 8वी किंवा5वीची मार्कशिट,भारतीय पासपोर्ट,पँनकार्ड,ड्राविंगलाईसेंस,आधार कार्ड इ.पैकि एक.
वालुर येथील नविन नाव नोंदनीचे अर्ज स्वीकरले जात नसुन यातील बहुतेक नवीन मतदारा जवळ टि.सी.नाहि या ठिकानी नविन मतदारांनी वयाच्या पुरावा म्हणुन आधार कार्ड.व रहिवासी पुरावा,राशनकार्ड,लाईट बिल,ग्रामपंचायत रहिवासी दिलेले असुन येथील बि.एल.ओ.म्हणतात कि शासनाचे आदेश आहे कि टि.सी.किंवा बेनाफाईट आवश्यक आहे. रहिवासी पुरावा व वयाचा पुरावे वरिल पैकि एक दिल्यावर टि.सी.ची आवश्यक्ताच नसते मग निरक्षर लोकांनी मतदानापासुन वंचित राहावे का???वरिल प्रकरणी दखल घेऊन सेलुतालुका निवडणुक यांचावर योग्य ती कार्यवाहि करावी.शासन नविन मतदारांना नाव समाविष्ठ करण्यासाठि आवाहन करीत असताना टि.सीची अट आहे हे सांगुन नविन मतदारांना त्यांच्या हक्कापासुन वंचित ठेवले जात असुन वरिल पैकि एक एक कागदपत्र घेऊन यादित नागरीकांचे नाव नोंदणी करणे बाबत संबधितांना आदेश द्यावा आशी मागणी पत्रकार संरक्षण समितीचे सेलु तालुकाध्यक्ष अनवर खाँ पठान यांनी दि.28/09/2018.रोजी एका निवेदनाद्वारे उपजिल्हाधिकारी सेलु यांना केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें