मोदी मुक्त भारत' झाला पाहिजे: राज यांचा नवा नारा - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 19 मार्च 2018

मोदी मुक्त भारत' झाला पाहिजे: राज यांचा नवा नारा

मोदी मुक्त भारत' झाला पाहिजे: राज यांचा नवा नारा


मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेयांनी शिवतीर्थावरील पक्षाच्या पाडवा मेळाव्यात 'मोदी मुक्त' भारताची हाक दिली. देशाला १९४७ साली पहिले स्वातंत्र्य मिळाले, तर दुसरे स्वातंत्र्य हे १९७७ मध्ये मिळाले आणि आता २०१९ मध्ये देशाला तिसरे स्वातंत्र्य मिळणार आहे अशा शब्दात आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी 'मोदी मुक्त भारत'चा नारा दिला. यासाठी सर्वच पक्षांनी एकत्र यावे असे आवाहनही राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात केले.
राज ठाकरे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. तर, काही दिवसांपूर्वी त्यांनी पवार यांची जाहीर मुलाखतही घेतली होती. त्यानंतर आयोजित आजच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
*राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशात दंगली घडतील*

पंतप्रधान नरेद्रे मोदी, केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर घणाघाती हल्ला चढवत असताना राज ठाकरे यांनी गंभीर आरोपही केले. येत्या काही महिन्यांमध्ये देशात राम मंदिराच्या मुद्द्यावरून दंगली घडतील, तशी माहितीच आपल्या हाती आल्याचे सांगत राज यांनी जनतेला सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. राम मंदिर झालेच पाहिजे, त्या बद्दल दुमत नाही. मात्र निवडणुकीतील फायदा मिळवण्यासाठी जर यांना राम मंदिर उभारायचे असेल तर मग राम मंदिर पुढच्या वर्षी झाले तरी चालेल, अशा शब्दात राज यांनी जोरदार हल्ला चढवला.
➖➖➖➖➖➖➖➖➖
*मुख्यमंत्री फडणवीस यांना केले लक्ष्य*
➖➖➖➖➖➖➖➖➖
'राज्यात गंभीर प्रश्न आहेत असे वाटत नाही, सर्व प्रश्न संपले आहेत, सर्व ठिकाणी आनंदी आनंद आहे. यामुळेच आमचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री गाणं गात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे 'वर्गातला मॉनिटर' आहेत. मॉनिटर हा शिक्षिकांचा आवडता पण विद्यार्थ्यांचा नावडता असतो.' अशा शब्दात राज यांनी सरकारच्या जाहीरातीवरून मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं.
➖➖➖➖➖➖➖➖➖
*'मुनगंटीवार म्हणजे 'शोले'तील सांबा'*
➖➖➖➖➖➖➖➖➖
सरकारच्या व्हायरल झालेल्या जाहिरातीत दिसलेले राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची तुलना राज यांनी प्रसिद्ध 'शोले' चित्रपटातील सांबा या व्यक्तिरेखेशी केली. राज म्हणाले की, शोले या चित्रपटाला ४० वर्षे झाली. इतक्या वर्षांनंतर सांबा कुठून आला असे म्हणत राज यांनी अर्थमंत्र्यांवरही टीका केली. मुनगंटीवार हे रजनीकांतचे १२वे डमी वाटतात अशा शब्दांत राज यांनी त्यांची खिल्ली उडवली
➖➖➖➖➖➖➖➖➖
*श्रीदेवींचे पार्थिव राष्ट्रध्वजात का गुंडाळले?*
➖➖➖➖➖➖➖➖➖
अभिनेत्री श्रीदेवी यांचे पार्थिव राष्ट्रध्वजात गुंडाळण्यावर राज यांनी आक्षेप नोंदवला. श्रीदेवींचे पार्थिव राष्ट्रध्वजात गुंडाळण्यासाठी श्रीदेवींनी असं काय राष्ट्रकार्य केलं असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला. ज्या व्यक्तीचा मृत्यू नेशत झाला त्याचं पार्थिव राष्ट्रध्वजात गुंडाळणं ही सरकारची चूक असल्याचं राज म्हणाले. नीरव मोदी प्रकरण मागे पडावं म्हणून श्रीदेवींचे प्रकरण सतत प्रसारमाध्यमांतू दाखवलं जात होतं असंही ते म्हणाले.

➖➖➖➖➖➖➖➖➖
*आणखी काय म्हणाले राज ठाकरे:*
➖➖➖➖➖➖➖➖➖
⚡ राफेल करार हा बोफोर्सपेक्षा मोठा घोटाळा.
⚡मोदींच्या परदेश दौऱ्यातून एकही पैसा भारतात आला नाही.
⚡मोदी मुक्त भारत व्हायला पाहिजे, यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे.
⚡छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकही धडा पाठ्यपुस्तकात नाही.
⚡तपास झाला तर नोटाबंदी हा देशातील सर्वात मोठा घोटाळा ठरेल.
⚡सरस्वती वंदनेच्यावेळी परप्रांतीय मुस्लीम विद्यार्थी शाळेबाहेर उभे राहतात.
*Share by Kawish e jameel*
⚡गुजरातचे माझ्यापुढे मांडलेले चित्र खोटे होते.
⚡पंतप्रधान मोदी देशाच्या जनतेशी सतत खोटे बोलत राहिले.
⚡राम मंदिर व्हायलाच पाहिजे, पण तुम्हाला निवडणुका जिंकण्यासाठी हा मुद्दा आणत असाल तर राम मंदिर पुढच्या वर्षी झाले तरी चालेल.
⚡ पुढच्या काही महिन्यात हिंदू मुस्लीम दंगली घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
⚡शहरात होणाऱ्या खर्चामुळे ग्रामीण भागाला निधी कमी पडतो.
⚡ मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडण्यासाठीच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन.
⚡सरकारबद्दल प्रत्येकाच्या मनात नाराजी आहे.
⚡ लागू केलेले नवे कर जनतेकडून वसूल करणार.
⚡ महाराष्ट्र आणि मराठी माणसाशी सरकारचं देणंघेणं नाही.
⚡राफेल करारात मोठा भ्रष्टाचार झाला आहे.
⚡आताचा मुख्यमंत्री हा बसवलेला मुख्यमंत्री आहे.
⚡'पॅडमॅन' आणि 'टॉयलेट एक प्रेमकथा' हे सरकारने प्रायोजित केलेले चित्रपट 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें