अमरावती, वाशिम, अकोला, नांदेड जिल्ह्यांचा हगणदारी मुक्ती बाबत पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री मा. ना. बबनराव लोणीकरांच्या हस्ते सन्मान - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 24 मार्च 2018

अमरावती, वाशिम, अकोला, नांदेड जिल्ह्यांचा हगणदारी मुक्ती बाबत पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री मा. ना. बबनराव लोणीकरांच्या हस्ते सन्मान

अमरावती, वाशिम, अकोला, नांदेड जिल्ह्यांचा हगणदारी मुक्ती बाबत पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री मा. ना. बबनराव लोणीकरांच्या हस्ते सन्मान

विशेष,प्रतिनिधी.
समशेर खान.
मुंबई. दि. 23. कोणत्याही चांगल्या कामाची सुरूवात स्वत:पासुन करणे गरजेचे असते, त्यामुळे स्वच्छतेची सुरूवात प्रत्येकाने स्व:पासुन करणे गरजेचे आहे. राज्यात सध्या स्वच्छता अभियान मोठया प्रमाणावर राबविले जात आहे, त्या *अनुषंगाने आजतागायत 25 जिल्हे हगणदारीमुक्त झाले आहे* परंतु जिल्हे हगणदारीमुक्त करून चालणार नाही तर *स्वच्छतेची शाश्वतता टिकवण्यासाठी राज्यात प्रबोधन पर चळवळ राबविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले*.

            पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत हगणदारीमुक्त झालेल्या *चार जिल्हयांचा श्री. लोणीकर यांच्या हस्ते मंत्रालयीन दालनात सत्कार करण्यात आला*. यावेळी ते बोलत होते.

 यावेळी अपर मुख्य सचिव श्याम लाल गोयल तसेच अमरावती, अकोला, वाशिम, नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

*श्री लोणीकर पुढे म्हणाले की, स्वच्छता ही चळवळ आज उदयास आली नसुन ही चळवळ पुर्वीपासुनच चालत आलेली आहे*. यासाठी *संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराजांनी स्वच्छतेसाठी आपले जीवन व्यतीत केले. त्यांचेच हे मोलाचे कार्य आपण पुढे नेत आहोत*. अगदी अल्पशा कालावधीमध्येच स्वच्छतेसाठी सर्वानी मोठे बहुमोलाचे योगदान देउन राज्स हगणदारीमुक्तीच्या अंतिम टप्यात आहे. राहिलेले जिल्हे ही लवकरच हगणदारीमुक्त होतील,अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच सध्या देशातील *महाराष्ट् राज्य हे क्रमांक एक वर असणे हे कौतुकास्पद असुन* स्वच्छतेची शाश्वतता टिकवण्यासाठी सर्वानी पुढाकार घेणे आवश्यक आहे, यासाठी प्रबोधनपर जनजागृतीकरणे गरजेचे आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

          राज्यातील *अमरावती अकोला, वाशिम, नांदेड* हे जिल्हे दि. 23 मार्च 2018 रोजी हागणदारीमुक्त जाहीर करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आयोजित केलेल्या सत्कार समारंभास अमरावती जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे, गटविकास अधिकारी भास्कर रेंगळे,प्रकल्प व्यवस्थापक प्रशांत सातव तसेच *अकोला जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी एस. राममुर्ती*,जि.प. अध्यक्षा संध्या  वाघोडे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम मानकर, गटविकास अधिकारी संदीप भंडारे, ग्रामसेवक रवि कोट, व वाशिम जि.प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही. इस्कापे, गटविकास अधिकारी डी.बी.पवार, ग्रामसेवक एस.पी. राउत तसेच *नांदेड जि.प चे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे*, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकरी  यांच्यासह पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी चारही जिल्हयातील हागणदारीमुक्त करण्याच्या सक्रीय चळवळीमध्ये सक्रीय  सहभागी झालेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्यासह प्रतिनिधींचा स्मतिचिन्ह, प्रशस्तीपत्र देउन सन्मान करण्यात आला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें